शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत “ स्वच्छ्ता ही सेवा “ या भारत सरकारच्या अभियानांतर्गत स्वच्छता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी “ Cleanliness is the foundation of a healthy and happy life” या उक्तीप्रमाणे शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ केला.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा हुबेहूब साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच शालेय जीवनात स्वतःची कामे स्वतः करावी , आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी काराव्यात इ. सवयी विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजाव्या तसेच ONE, WHO MAINTAINS CLEANLINESS KEEPS AWAY DISEASES ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वच्छता दिनाचे तसेच ”स्वच्छता ही सेवा” या उपक्रमाचे आयोजन..