शाळेत शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले . प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रेरणा मिळावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा तसेच व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध खेळाचे एकूण ४९ स्टॉल लावले होते . विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे तसेच विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक क्षेत्राचा तसेच सृजनशक्तीचा विकास व्हावा हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे...
शाळेत शाळेच्या इ.१० वी च्या नवव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना तसेच शाळेने त्यांच्याविषयी जोपासलेल्या सर्व संस्कारांना मनोगताच्या माध्यमातून उजाळा दिला . तसेच त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते इ.१० वी पर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची चित्रफित दाखविण्यात आली व शाळेने कशाप्रकारे त्यांच्या आठवणी तसेच बालपण जपून ठेवले आहेत याची त्यांना आठवण करून दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र पवार सर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री दिपक औटे सर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले . प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रेरणा मिळावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याची महती सांगणारे मनोगत पर भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे शौर्य गीत देखील सादर केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले .शाळेतील प्राथमिक, उच्च- प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागातुन एक स्टुडन्ट ऑफ द इयर २०२३-२४ या शाळेतील मुख्य पुरस्काराचे वितरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत १०० % उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० % उपस्थितीचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे .
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र – तिसरे हे इ.६ वी ते इ .९ वी या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १७ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपली आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.याच कार्यक्रमात सन २०२२- २३ मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमधील पहिल्या दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे सन्मानचिन्ह ,इ.१० वी ची सनद तसेच पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “प्रगतीच्या पाऊलखुणा” असे शिर्षक असलेल्या हस्तलिखिताचे विमोचन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या अंतर्गत " आपले कुटूंब " ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र दुसरे हे इ.२ री ते इ.५ वी या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले कुटूंब या थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक संदेशपर नाट्यछटांचा तसेच समाजातील विविध चुकीच्या चालीरीतीना कशाप्रकारे आपण बदलवू शकतो या प्रकारचा संदेश देणाऱ्या विविध नाट्यछटांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे तसेच सृजनशील समाज निर्मिती व्हावी हा मानस ठेवून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या अंतर्गत " आपले कुटूंब " ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र पहिले हे नर्सरी ते इ.१ ली या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले कुटूंब या थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे
शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशात येऊन त्यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यासमोर उभे केले.तर काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर पावर पॉइंट प्रेसेंटेशनच्या माध्यमातून प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम केला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत " आपले कुटूंब " ही थीम असलेल्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या रंगीत तालीमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे व्यासपीठ कौशल्य विकसित करणे व विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यक्रमाचा नियोजनबद्ध सराव करुन घेणे इ. सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही क्षणांचे छायाचित्रे.
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.महिला सशक्तिकरण ( Women Empowerment ) ही काळाची गरज, विद्यार्थ्यांना महान व्यक्ती विषयी माहिती देणे, बालिका दिनाविषयी माहिती देणे या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सांघिक खेळामध्ये मुला -मुलींचे क्रिकेट व खो-खो तसेच कबड्डी व वैयक्तिक मध्ये तीन पायाची शर्यत , चमचा लिंबू अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. Joyful Learning तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना भविष्यात असणाऱ्या खेळाच्या विविध संधीबद्दल माहिती देणे, तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने राबविण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी " प्रगतीच्या पाऊलखुणा " असे शीर्षक असणारे हस्तलिखित तयार केलेले असून त्याचे विमोचन शाळेच्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा संग्रह केलेल्या कविता, लेख ,चित्र, सामान्य ज्ञान इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाची आवड लागावी, नवनिर्मितीला चालना देणे, भविष्यात जुने वर्गमित्र , त्यांची आठवण,त्यांचे हस्ताक्षर याची आठवण म्हणून हे हस्तलिखित छापील स्वरूपातील प्रति जेणे करून भविष्यात जसे तसे राहील.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजीनगर ते शेगाव दर्शन या ठिकाणी दोन दिवसीय सहलीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अनुभव देणे, आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन, परिस्थितीशी जुळवून घेणे, भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती देणे इ. गोष्टींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रसंगांची माहिती देण्यात आली तसेच सिंदखेड राजा, जिजाऊ जिजाऊ सृष्टी इ. ठिकाणांना भेट देऊन या ठिकाणांविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शेगाव मधील विविध रम्य दृश्य, विविध प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यात आले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी शेगावला लागून असलेला माऊली वॉटर पार्कचा मनसोक्त आनंद घेतला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वाटर पार्कशी संबंधित विविध असणारे विविध प्रात्यक्षिक स्वतः करून आनंद घेतला.त्यातील काही क्षणाचे छायाचित्रे.
शाळेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजीनगर ते सृष्टी ऍग्रो टुरिझम सेंटर याठिकाणी सहलीचे आयोजन केले होते .विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अनुभव देणे, आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये प्रवासाचे कौशल्य विकसित करणे इ. गोष्टींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांना याप्रसंगी आपल्या समाजातील Community Helper बद्दल माहिती देऊन त्यांच्या कामाचे स्वरूप याबद्दल प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला व ती आपल्या साठी कसे महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध असलेला रेनडान्स चा मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके जसे की बैलगाडी फेरी, आगगाडी फेरी, मनोरंजनात्मक खेळ असणारे विविध प्रात्यक्षिक स्वतः करून आनंद घेतला. तद नंतर विद्यार्थ्यांनी निसर्ग भोजनाचा एकत्रित आनंद घेतला.त्यातील काही क्षणाचे छायाचित्रे.
शाळेत दीपावली सणानिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत दीपावली सणाविषयी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दीपावली उत्सवानिमित्त शाळेत दप्तराविना शाळा हा उपक्रम शाळेने राबविला. या उपक्रमाचे विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या पोशाखामध्ये तसेच त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थासह आले व संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय,कृती, प्रेरणादायक गोष्टी, तसेच आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन व्यथित केला.याप्रकारे विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून प्रथम सत्रातील शेवटच्या दिवसाचे नियोजन शाळेने केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपली धार्मिक परंपरा तसेच दिवाळी सणाशी निगडित विविध दिवसांची माहिती देण्यात आली . आपण दिवाळी सण का साजरा करतो ? त्या मागील पार्श्वभूमी काय आहे ? याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत स्वच्छ्ता ही सेवा या भारत सरकारच्या अभियानांतर्गत कचरा मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक महाश्रमदान स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ केला.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा हुबेहूब साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच शालेय जीवनात स्वतःची कामे स्वतः करावी , आपल्या दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी काराव्यात इ. सवयी विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना एकात्म मानवतावाद तसेच समाजासाठी आपली असलेली बांधिलकी यांची माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत श्री. गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीची शालेय परिसरातून ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून स्थापना व आरती करण्यात आली. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवानिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा हा उद्देश ठेवून शाळेने उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.